जिल्हास्तरावर स्वच्छता रथाच्या शुभारंभाने अभियानास प्रारंभ

 

संपूर्ण देशामध्ये दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर,2017 या कालावधीमध्ये स्वच्छ ही सेवा अभियान राबविले जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरावर आज रोजी स्वच्छता रथाच्या शुभारंभाच्या माध्यमातून या अभियानास प्रारंभ झाला.स्वच्छता रथाचा शुभारंभ मा.सौ.शौमिका महाडी,अध्यक्षा यांच्या हस्ते संपन्न झाला.या शुभारंभ कार्यक्रमास जि.प.कोल्हापूर मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर,तसेच,मा.श्री.इंद्रजित देशमुख,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर, मा.श्रीम.सुषमा देसाई,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.),मा.डॉ.प्रकाश पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

दि.14/9/2017 रोजी अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी साधारण सभेमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्यात आली होती.आज स्वच्छतेच्या रथाच्या माध्यमातून स्वच्छता प्रबोधनाच्या कामास प्रारंभ करण्यात आला असून या पंधरवडयामध्ये ग्राम स्तरावर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत,यामध्ये यामध्ये स्वच्छतेसाठी प्रभातफेरी,स्वच्छतेची शपथ ,परिपाठ व हातधुवा दिन असे उपक्रम शालेयस्तरावरती राबविले जाणार आहेत,तर ग्राम पंचायतस्तरावर स्वच्छतारथाच्या माध्यमातून प्रबोधन करणे.स्वच्छता पथक स्थापन करणे,प्लास्टिक पिशव्या न वापरणेबाबत जनजागृती करणे,गवंडी प्रशिक्षणाच्या माध्यमातून शौचालय बांधकाम शुभारंभ करणे,पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करणे,परिसर स्वच्छता आणि घनकचरा व सांडपाणाी व्यवस्थापन अंतर्गत ग्राम पंचायतींचा सर्व्हे करणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत.

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी,अधिकारी आणि ग्रामस्थ यांना सक्रिय सहभाग घेण्याबाबत मा.सौ.शौमिका महाडीक,अध्यक्षा,जि.प.कोल्हापूर यांनी स्वच्छता रथाच्या शुभारंभावेळी आवाहन केले.

—————————————————————————————————–

 

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

ग्रामपंचायत मुडशिंगी येथे स्वच्छता ही सेवा अभियानास शुभारंभ

आमदार मा.अमल महाडीक यांच्या स्वच्छता  श्रमदानातून अभियानास प्रारंभ

कोल्हापूर 16/9/2017

आज रोजी ग्राम पंचायत मुडशिंगी,ता.करवीर येथे आमदार मा.अमल महाडीक यांचे उपस्थितीत स्वच्छता हि सेवा अभियानाचा शुभारंभ करणेत आला. सुरवातीला शालेय मुलांचे मार्फत स्वच्छता फेरी काढणेत आली. या सोबत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता रथाच्या माध्यमातुनही प्रबोधनपर संदेश देण्यात आले. प्रभात फेरी नंतर स्वच्छता मोहिम घेणेत आली. यामध्ये आमदार मा. अमल महाडीक यांचेसोबत ग्रामपंचातयीचे पदाधिकारी ग्रामस्थ यांनी देखील हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. यानंतर उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपत घेतली.

घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनांतर्गंत ग्रा.प. मुडशिंगीचा शिवाजी विद्यापिठाच्या तंत्रज्ञान विभागाकडून सर्व्हे केला जाणार आहे. यासाठी हे सर्व विध्यार्थी व प्राद्यापक मुडशिंगी येथे उपस्थित होत. या विध्यार्थ्यांना आमदार मा. अमल महाडीक यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्लास्टीकचा वापर न करणेबाबत उपस्थितांना आवाहन केले. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवून जिल्हयासाठी रोल मॉडेल म्हणुन गाव तयार व्हावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर आधारित तयार केलेले स्टिकर्स मा. आमदार साहेब यांचे शुभहस्ते काही घरावर लावण्यात आली.

या अभियान शुभारंभासाठी मा. श्रीम. सुषमा य.देसाई ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.) ,जि.प. कोल्हापूर, मा. श्री. सचिन घाडगे गविअ. करवीर तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ ,सल्लागार व समुह समन्वयक ,ग्रा.प. सरपंच ,उपसरपंच ,पदाधिकारी व ग्रामसेवक इ. उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूर यांच्यामध्ये होणा-या शिक्षक प्रशिक्षण कराराचे हस्तांतरण

 जिल्हा परिषद कोल्हापूर ,रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूर यांच्यामध्ये होणा-या शिक्षक प्रशिक्षण कराराचे हस्तांतरण आज दिनांक 15/09/2017 इ. रोजी शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. जिल्ह्यातील किमान 10 हजार शिक्षकांना टेक्नोसेव्ही प्रशिक्षण व ज्ञानरचनावादी साहित्यनिर्मिती तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात ऊल्लेखनीय कामगिरी करणा-या शिक्षकांचा रोटरी व इनरव्हील तर्फे *नेशन बिल्डर पुरस्कार* देऊन गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडीक व अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक, रोटरी प्रांतपाल श्री. आनंद कुलकर्णी, जिल्हा परिषद सीईओ डॉ. श्री. कुणाल खेमनार, शिक्षण समिती सभापती श्री. अंबरीषसिंह घाटगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख, शिक्षण उपसंचालक श्री. मकरंद गोंधळी, प्राचार्य DIECPD     श्री. आय. ई. शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी      श्री. किरण लोहार, श्री. प्रसन्न देशिंगकर तसेच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ करवीर, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज चे सर्व पदाधिकारी, रोटरीचे सर्व सहाय्यक प्रांतपाल, शिक्षक वर्ग तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात खासदार श्री. धनंजय महाडीक, सौ. शौमिका महाडीक, सीईओ डॉ. श्री. कुणाल खेमनार, प्रांतपाल श्री. आनंद कुलकर्णी, श्री. अंबरीषसिंह घाटगे यांनी रोटरीच्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात असेच मौलीक उपक्रम जिल्हा परिषदेच्या सोबत करून समाजाला प्रेरित करावे असे नमूद केले. प्रास्ताविक श्री. प्रसन्न देशिंगकर यांनी सादर केले. आभार श्रीमती रितू वायचळ यांनी मानले.

 

                                                                                             श्री. सुभाष चौगुले

                                                                                      शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

                                                                                      जिल्हा परिषद, कोल्हापूर

स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी अभियान – जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा व लघुपट स्पर्धेचे निकाल जाहिर

 

केंद्र शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी अभियान अंतर्गत  निबंध स्पर्धा व लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता सहाय्य संस्था,यांचेकडून निर्देश देण्यात आले होते.याप्रमाणे कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत या दोन्ही स्पर्धांचे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून आयोजन करण्यात आले होते.जिल्हास्तरावर प्राप्त  निबंध आणि लघुपट यांचे परिक्षण जिल्हास्तरावर करण्यात आले असून या स्पर्धांचा निकाल जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीमध्ये दि.11/8/2017 रोजी घोषित करण्यात आला असून,या स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे –

स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी -निबंध  स्पर्धा – जिल्हास्तर निकाल
अ.क्र विजेत्या र्स्प्धकाचे नाव प्राप्त क्रमांक गट
1 कु.ऋ शिकेश दत्तात्रय पाटील प्रथम क्रमांक प्रथम गट
2 कु.विवेक उत्तम तळवार,मा.श्री.आण्णासाहेब डांगे कॉलेज,हातकणंगले व्दितीय क्रमांक
3 कु.काजल बबन पाटील,माध्यमिक विद्यालय,शेळोशी,गगनबावडा तृतीय क्रमांक
4 श्री.कपिल साताप्पा पाटील,प्रा.शिक्षक,न.पा.शिक्षण मंडळ,कागल प्रथम क्रमांक व्दितीय गट
5 प्रियदर्शनी प्रकाश भोसले,हलकर्णी,ता.चंदगड व्दितीय क्रमांक
6 प्रथमेश सतीश पाटील, तृतीय क्रमांक
स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी – लघुपट  स्पर्धा – जिल्हास्तर निकाल
1 अरूण कृष्णा काशिद,संतमळा,इचलकरंजी,हातकणंगले प्रथम क्रमांक व्दितीय गट
2 प्रसाद महेकर,कोल्हापूर व्दितीय क्रमांक
3 बी.के.पाटील,येळवण जुगाई,कोल्हापूर तृतीय क्रमांक

वरील विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरावर दोन्ही गटांसाठी प्रथम क्रमांकास रू.15हजार,सन्मानचिन्ह व पारितोषिक,व्दितीय क्रमांकास रू.10 हजार ,सन्मानचिन्ह व पारितोषिक व तृतीय क्रमांकास रू.5 हजार सन्मानचिन्ह व पारितोषिक दिले जाणार आहे.या विजेत्या स्पर्धकांची नावे,निबंध आणि लघुपट राज्यस्तरावरती सादर केली असून प्रत्येक जिल्हयातील तीन विजेत्या स्पर्धकांपैकी राज्यस्तरावर तीन विजेते निवडले जाणार आहेत.कोल्हापूर जिल्हयातून वरील सर्व स्पर्धक हे राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र ठरले आहेत.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत व नैदानिक चाचणी सन 2017-18

शिक्षण हक्क कायदयातील कलम 29(2)(ह) नुसार मूल्यमापन पध्दतीद्वारे विदयार्थ्यांच्या ज्ञान, आकलन आणि उपयोजन क्षमतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. कायद्यातील या अपेक्षा आणि तरतुदी विचारात घेऊन दिनांक 20 ऑगस्ट 2010 च्या शासन निर्णयानुसार राज्यात इयत्ता 1 ली ते 8 वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पध्दती लागू केली आहे.

वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या मुलभूत क्षमतांची परिपूर्ण तयारी झाल्यास          ज्ञानग्रहन आणि आकलनाचा मार्ग सुलभ होतो. यामध्ये एकही मुल अप्रगत राहू नये यासाठी संपूर्ण राज्यात प्रत्येक विदयार्थ्याच्या पायाभूत संपादणूकीची नियमित पडताळणी करुन शैक्षणिक दर्जा ंउंचावण्यासाठी गरजाधिष्ठित कृती कार्यक्रमाची आखणी करणे तसेच ज्या इयत्तेत बालक शिकत आहे त्या इयत्तेच्या क्षमतांचीही संपादणूक वेळच्या वेळी तपासून व मदत करून अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राज्यामध्ये सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणेत आला आहे. त्यांतर्गत सन 2017-18 मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित या विषयाच्या शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करणेत आले आहे. यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 या तीन चाचण्यांचा समावेश आहे. सर्व नियमित विद्यार्थ्यांच्या किमान अपेक्षित क्षमता संपादणूकीची खात्री करणे व गुणवत्ता तपासणे आणि सुधारणे हा या चाचण्यांचा हेतू आहे.

सन 2017-18 मध्ये इयत्ता 2 ते 8 साठीची पायाभूत चाचणी सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमधील इयत्ता 2 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेणेत येत आहे. तसेच इयत्ता 9 वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी (राज्य मंडळ) संलग्नित असलेल्या राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता 9 वी तील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेणेत येत आहे. सदर चाचण्यांचे आयोजन राज्यस्तरावरुन प्रश्नपत्रिका पुरवून दिनांक 7 व 12 सप्टेंबर 2017 या कालावधीत खालीलप्रमाणे करणेत आले आहे.

 

इयत्ता विषय दिनांक वेळ
इ. 2 री ते इ. 9 वी प्रथम भाषा 7 सप्टेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00
इ. 2 री ते इ. 9 वी गणित 8 सप्टेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00
इ. 3 री ते इ. 9 वी इंग्रजी (तृतीय भाषा) 11 सप्टेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00
इ. 6 वी ते इ. 9 वी विज्ञान 12 सप्टेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00

 

.  जिल्ह्यातील 3595 शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेणेत येत आहे. यामध्ये एकूण 413970 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. तर जिल्ह्यातील 858 शाळांमध्ये नैदानिक चाचणी घेणेत येत आहे. यामध्ये एकूण 61114 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत.

सदर चाचणी आयोजनाबाबत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांना कळविणेत आले आहे. चाचणीमधील लेखी प्रश्नाबरोबरच तोंडी, प्रात्यक्षिक इतर दिवशी घेण्याबाबतचे नियोजन शाळास्तरावर करणेत येणार आहे. सदर पायाभूत चाचणीचे शाळास्तर संनियंत्रण करणेसाठी जिल्हास्तरावरून 12 अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे.

श्री. सुभाष चौगुले

                                                                                        शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                         जिल्हा परिषद, कोल्हापूर

जिल्हा शिक्षक पुरस्कार 2017 वितरण कार्यक्रम संपन्न

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दि. 5 सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा करणेत येतो. या दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 20 गुणवंत शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार 2017 ने सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट शैक्षणिक कामकाजाबद्दल 2 शिक्षकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक 05 सप्टेंबर 2017 इ. रोजी दुपारी 3.00 वा. राजर्षि शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आयोजित करणेत  आला होता.

सदर कार्यक्रम मा. सौ.शौमिका महाडिक, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अध्यक्षेखाली व मा. आमदार श्री.सुरेश हाळवणकर, मा.आमदार श्री.चंद्रदीप नरके यांच्या शुभहस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.

प्रास्ताविकामध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.सुभाष चौगुले, यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती विद्यार्थी गुणवत्ता, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंमलबजावणी व शाळांच्या गुणवत्तेच्या संदर्भात सर्वंकष आढावा सादर केला.

कार्यक्रमाच्या मनोगतामध्ये सभापती अर्थ व शिक्षण, मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे यांनीजिल्हा परिषदेच्या 100% शाळा डिजिटल करणेचा संकल्प व्यक्त केला. तसेच जिल्हा परिषदेमार्फत स्वत:चे सॉफ्टवेअर विकसित करुन सर्व शाळांना पुरविणेत येईल असे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सुजाण विद्यार्थी अभियान राबविणेत येणार असलेचे सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील शिक्षणातील गुणवत्तेचा उहापोह करत विद्यार्थी विकासामध्ये शिक्षकांचे महत्व विषद केले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी बहुमोल योगदान देण्याचे आवाहन केले.

मा.आमदार चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यामध्ये नवनवीन उपक्रम राबविले जातात, शिंगणापूर क्रीडा प्रशाला ही राज्यामध्ये आदर्श प्रशाला म्हणून काम करीत आहे. तसेच शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करणेसाठी व शाळांच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करु असे सांगितले.

मा. आमदार श्री.सुरेश हाळवणकर यांनी पुरस्काराने व्यक्तीचा सन्मान होतो, अधिक प्रेरणेचे काम करण्याची ऊर्जा मिळते.जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा पुरस्कार म्हणजे गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा गौरव आहे. राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षकाचं योगदान मोलाचे आहे याची जान ठेवून प्रत्येक शिक्षकाने उत्कृष्ट कामकाज करुन बलशाली, सामर्थ्यशाली भारत घडविणेच्या दृष्टीने योगदान दयावे, तसेच डॉ.राधाकृष्णन, डॉ.जे.पी.नाईक या सारख्या विचारवंताचे विचार आचरणात आणावेत असे सांगितले. तसेच शिक्षण विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना व कामकाजाबाबत आपण समाधानी असलेचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणामध्ये मा. सौ.शौमिका महाडिक, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी शैक्षणिक व्यवस्था, विद्यार्थी गुणवत्ता, शिक्षकांचे राष्ट्र उभारणीमधील योगदान यांचे महत्व विषद करुन शिक्षक पुरस्कार निवडीवेळी जिल्ह्यामध्ये शिक्षक ज्ञानदानामध्ये त्यागवृत्तीने उत्कृष्ट योगदान देत असलेबद्दल दिसून आले याबद्दल समाधान व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी मा.श्री.सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष, जि.प.कोल्हापूर, मा.श्री.विशांत महापुरे, समाजकल्याण सभापती, मा.श्री.सर्जेराव पाटील (पेरीडकर), बांधकाम सभापती, मा.सौ.शुभांगी शिंदे, महिला व बालकल्याण सभापती, मा.श्री.इंद्रजित देशमुख, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी व सन्माननिय जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

                                             

कृषि विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरद्वारे कृषि दिनानिमित्त्य  वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालेबाबत

मा. कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त्य  कृषि विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत आज कृषि दिन संपन्न झाला. सदर कार्यक्रमानिमित्त्य मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. सर्जेराव ज्ञानदेव पाटील यांच्या शुभ हस्ते  मा. कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले. तसेच मा. नाईक यांच्या कार्याविषयी मा. इंद्रजीत देशमुख साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे व्याख्यान झाले. सदर कार्यक्रमाकरिता विभागीय कृषि सहसंचालक मा. डॉ. एन. टी. शिसोदे  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा. श्री. बसवराज मास्तोळी यांच्या सोबत जिल्हा परिषदेकडील सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी तस्ेाच कर्मचारी उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद जुन्या इमारतीच्या आवरात वृक्षारोपण कार्य्रकम घेणेत आला. मा. अध्यक्ष सौ शौमिका अमल महाडिक, मा. उपाध्यक्ष श्री. सर्जेराव ज्ञानदेव पाटील , मा. श्री. विशांत सुरेश महापुरे सभापती समाजकल्याण, मा.श्री राहुल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी सभापती हातकणगले राजेश पाटील, मा. इंद्रजीत देशमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. चंद्रकांत सुर्यवंशी कृषि विकास अधिकारी, मा. चंद्रकांत वाघमारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी   (सा. प्र.)  मा. राजेंद्र भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी  ( ग्रा. पं. ) मा. श्री. सतिश रोकडे जिल्हा कृषि अधिकारी  मा. दिनेश वरपे जिल्हा कृषि अधिकारी  यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

Sd/-

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद, कोल्हापूर

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कंत्राटी पद्धतीने गट समन्वयक पदाची भरती

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा  परिषद कोल्हापूर येथे कंत्राटी पद्धतीने गट समन्वयक  पदाची भरती