राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथील सन 2021-22 साठीची खेळाडू निवड यादी

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथील सन 2021-22 साठीची खेळाडू निवड यादी

जलजीवन मिशन श्री संजयसिंह चव्हाण {भा प्र से} मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी जलजीवन मिशन याविषयी दिलेली माहीती

जलजीवन मिशन श्री संजयसिंह चव्हाण {भा प्र से} मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी जलजीवन मिशन याविषयी दिलेली माहीती

स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ‘स्वच्छता रथ’ उदघाटन व ‘स्वच्छता संवाद’ उपक्रमाचे आयोजन

कोल्हापूर : 27.09.2021

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अतर्गंत “‍स्वच्छता ही सेवा “‍ अभियान दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविणेत येत आहेत.
या अभियानअंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे स्व्‍च्छता रथाचे उदघाटन कार्यक्रम आणि गाव स्तरीय यंत्रणेसोबत स्वच्छतेचे सातत्य, स्वच्छतेची शाश्वतता राखण्यासाठी तसेच हागणदारीमुक्त्‍ गाव अधिकच्या (ODF +) अनुषंगाने ऑनलाईन स्वच्छता संवाद उपक्रम संपन्न्‍ झाला.स्वच्छता रथाचे उदघाटन मा. ना. हसन मुश्रीफ, मंत्री ग्रामविकास व कामगार, महाराष्ट्र राज्य , मा. ना. सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री, गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री महोदय कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न्‍ झाले.
यानंतर जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी ऑनलाईन ‘स्वच्छता संवाद’ उपक्रमांतर्गत जिल्हयातील गावस्तरीय यंत्रणेसोबत स्वच्छता विषयक संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्त आहेच आता तो हागणदारीमुक्त अधिक करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असून, यासाठी गावस्तरावर स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे आणि ग्रामीण जनतेला 55 लि. प्रति माणसी प्रमाणे पाणीपुरवठा ही कामे प्राधान्याने करणेचे आवाहन केले. तसेच, ग्राम पंचायतींनी स्वच्छतेचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन संदर्भात भविष्याच्या दृष्टिने संबंधित गावातील तरंगती लोकसंख्येचा ही (फ्लोटींग पॉप्युलेशन) विचार करावा. गावातील पारंपारिक नदी, नाले, ओढे यांची रूंदी पूर्ववत करावी. तसेच येत्या 1 तारखेला ज्येष्ठ नागरिक दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून संबंधित गावातील ज्येष्ठ नागरिकांचे 100 टक्के लसीकरण कसे होईल, याबाबत सरपंचांनी ठोस नियोजन करावे,अशा सूचना मा.पालकमंत्री यांनी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. राहुल पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत देशात जिल्हा अव्वल करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याबाबत आवाहन केले.
या उपक्रमासाठी मा. आमदार श्री. राजेश पाटील, मा. श्री. राहुल पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. जयवतंराव शिंपी, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर, मा.सौ. रसिका पाटील, सभापती, अर्थ व शिक्षण समिती, जि. प. कोल्हापूर, मा. सौ. शिवानी भोसले, सभापती, महिला व बालकल्याण समिती, जि.प. कोल्हापूर, मा. श्री. अजयकुमार माने, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. श्री. शंकर जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर, मा. श्री. अरूण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं), जि. प. कोल्हापूर, मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक, (जल जीवन मिशन), जि. प. कोल्हापूर उपस्थित होते.
ऑनलाईन स्वच्छता संवाद कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील मा.जिल्हा ‍परिषद सदस्य, मा. पंचायत समिती सभापती, मा. पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी ‍ सेविका, स्वच्छाग्रही अशा सुमारे 10,192 लोकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त गाव अधिक, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण- 2021, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर स्वच्छतासंदेश देणारा स्वच्छता रथ हा जिल्हयातील गावांमध्ये फिरणार आहे. स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ग्राम पंचायत स्तरावर स्वच्छता श्रमदान, प्लास्टीक संकलन, स्वच्छता रॅली, स्वच्छता शपथ, स्वच्छता घोषवाक्य लेखन स्पर्धा असे विविध उपक्रम राबविणेत येत आहेत.

स्वच्छता श्रमदान मोहिमेतून “स्वच्छता ही सेवा “अभियानाचा जिल्हयात शुभारंभ

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2021या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविणेत येत आहे. या अभियानांतर्गत आज जिल्हयातील सर्व गावांमध्ये श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

       या अभियान अंतर्गत ग्राम पंचायत शिरोली (पुलाची), ता. हातकणंगले येथे मा. खासदार श्री. धैर्यशील माने यांनी स्वच्छता श्रमदान व शोषखड्डा बांधकाम शुभारंभ केला. तर ग्रामपंचायत सडोली (खालसा), ता. करवीर येथे मा. श्री. राहूल पाटील, अध्यक्ष, जि.प. कोल्हापूर व मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांनी स्वच्छता श्रमदानाचे माध्यमातून अभियानाचा शुभारंभ केला. ग्रामपंचायत मसोली, ता. आजरा येथे मा. श्री. जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष, जि.प. कोल्हापूर यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
       या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता श्रमदान करून   स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत  स्वच्छता फेरी व सायकल रॅलीचे आयोजन करून स्वच्छतेचे संदेश देण्यात आले.  गावामध्ये स्वच्छता घोषवाक्य रंगविणे स्पर्धेअंतर्गत गावामध्ये स्वच्छतेचे संदेश रंगविणेत आले. तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी गावस्तरावर सांडपाणी व्यवस्थापनासाठी  शोषखड्डे बांधकाम शुभारंभ व प्लास्टीक संकलन  असे विविध स्वच्छता विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यासोबत पदाधिकारी व अधिकारी यांनी गावातील स्वच्छतेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.  या अभियानातील विविध स्वच्छता उपक्रमांमुळे जिल्हयातील जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF +)  होणेसाठी मदत होणार आहे.
       या उपक्रमामध्ये मा. जिल्हा परिषद सदस्य, मा. सभापती, पंचायत समिती व सदस्य, पंचायत समिती, गटविकास अधिकारी सर्व, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, तरुण मंडळे, महिला मंडळे, बचत गट व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. या अभियानाचे सनियंत्रण मा. श्री. राहूल पाटील, अध्यक्ष, जि.प. कोल्हापूर मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली  करणेत येत आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये 2 लाख 42 हजार मुर्ती संकलन

दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमांतर्गत एकूण 242191 मुर्ती संकलन तर सुमारे 500 टन इतके निर्माल्य संकलन करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे. विशेषत: या उपक्रमांतर्गत ü 2908 गणेशमुर्तींचे विजर्सन हे घरच्या घरीचं करण्यात आले.

पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने वर्ष 2015 पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या वर्षी ही जिल्हयातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेवून उपक्रम यशस्वी केला.

या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींनी सहभागी होवून जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवणेबाबतचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. राहूल पाटील यांनी केले होते. उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेणेसाठी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य तसेच तालुक्यातील सर्व सभापती यांना आवाहनपत्र देणेत आलेली होती.

या उपक्रमाबाबतच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बैठकांच्या माध्यमातून उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. उपक्रम यशस्वी करणेसाठी तसेच जास्तीत जास्त लोकसहभाग मिळविणेसाठी व ग्राम पंचायत स्तरावर पर्यायी व्यवस्थांची निर्मिती करणेसाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना समन्वयासाठी ग्राम पंचायती देण्यात आलेल्या होत्या. उपक्रम यशस्वी करणेसाठी मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रमांतर्गत ग्राम पंचायत सडोली खा., ता. करवीर येथे मा. श्री. राहूल पाटील, अध्यक्ष,जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी ग्राम पंचायतस्तरावर पर्यायी व्यवस्थेमध्ये गणेशमुर्ती विसर्जन केले. तसेच ग्राम पंचायत टोप, ता. हातकणंगले येथे मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी ग्राम पंचायत स्तरावर पर्यायी व्यवस्थेमध्ये गणेशमुर्ती विसर्जन केले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सर्व सन्माननिय सदस्य, पदाधिकारी, पंचायत समिती सभापती, सदस्य तसेच लोकप्रतिनीधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रमाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले.

स्वच्छता पथकाचा जिल्हा परिषदेकडुन निरोप समारंभ -मा.अध्यक्ष श्री. राहुल पाटील यांच्या हस्ते पथकातील कर्मचा-यांना प्रशस्तीपत्र देवून आभार व्यक्त करणेत आले.

       जिल्हयातील अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये स्वच्छतेचेे काम चांगल्या पध्दतीने पार पाडून बहुमूल्य योगदान दिलेबद्दल पुणे महानगरपालिका स्वच्छता पथकाला मा. श्री. राहुल पाटील , अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून आभार व्यक्त करणेत आले. जिल्हयातील पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छतेसाठी पुणे येथून जिल्हयामध्ये दाखल झालेले पथकाने  शिये, तालुका करवीर, चंदुर, इंगळी तालुका हातकणंगले, व शिरटी, हासुर, नांदणी, कवठेगुलंद, हेरवाड, खिद्रापूर, अकिवाट, बस्तवाड, तालुका शिरोळ या 11 गावांमध्ये स्वच्छतेचे चांगले काम केले. याबदल मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. यावेळी बोलताना ,जिल्हयातील अतिवृष्टी आणि पुरपरिस्थतीनंतर पुरपश्चात करावयाच्या स्वच्छतेसाठी, पुणे महानगर पालिका स्वच्छता पथकाकडुन गाव स्तरावर केलेले काम हे कौतुकास्पद असुन , यामुळे स्वच्छतेच्या कामास गती मिळाली आहे. यापुढे आपणाकडुन असेच  सहकार्य मिळावे असे आवाहन मा. श्री. राहुल पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी यावेळी केले.
       यावेळी, पुणे महानगर पालिका स्वच्छता पथकाचे आरोग्य निरिक्षक श्री. राजेश रासकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छतेचे काम करत असताना, अनेक अडचणी आल्या पण तालुका आणिजिल्हा स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केल्यामुळेच स्वच्छतेचे काम चांगल्या प्रकारे करता आलेचे सांगितले.  याकार्यक्रमाला  श्री. अजयकुमार माने, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. राहूल कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी,  पुणे महानगर पालिका स्वच्छता पथक कर्मचारी व  जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.

*महापुरानंतर स्वच्छते साठी नृसिंहवाडी येथे जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता श्रमदान*

जिल्ह्यातील महापूर ओसरला असून पुर बाधित सर्व गावांमध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची कामे सुरु आहेत याच पार्श्वभूमीवर आज ग्राम पंचायत नृसिंहवाडी, ता. शिरोळ येथे मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य  कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी त्यांनी स्वतः रस्त्यांवर साचलेला गाळ उपसण्यासाठी श्रमदान केले.  
          या श्रमदानासाठी जिल्हास्तरावरून मा.श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक , जलजीवन मिशन , जि.प.कोल्हापूर, मा.श्री. अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं) जि.प.कोल्हापूर, मा.श्री राहूल कदम, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि .प. कोल्हापूर , तसेच पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
      तालुका स्तरावरून मा.श्री. एस. एस. कवितके , गटविकास अधिकारी, शिरोळ व पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ग्राम पंचायत नृसिंहवाडीच्या सरपंच मा. सौ. पार्वती कुंभार, सामाजिक कार्यकर्ते श्री. दादेपाशा पटेल, ग्राम पंचायत सदस्य, ग्राम सेवक तसेच सर्व ग्राम पंचायत  कर्मचारी व ग्रामस्थ यांनी श्रमदानातून गाळ काढण्याचे काम केले. या श्रमदानासाठी शेजारील गावातून मजूर घेण्यात आले होते. सकाळी ७ वाजल्यापासून श्रमदानाला सुरुवात झाली होती.