घर गृहस्वामीनीचे योजना राबविणे

घर म्हणजे मानवी संस्कृतीला पूरक ठरलेली प्रेरक संस्था आहे. स्त्रियांचा मानसन्मान वाढविण्यासाठी त्यांच्या असलेल्या घरांची नोंद पती पत्नी दोघांच्या नांवे असणे आवश्यक आहे. राजर्षि शाहू महाराजांचा समतेचा विचार समोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव उपक्रम यशस्वी करण्यास ग्रामस्थांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने घर दोघांचे संकल्पना राबवित असताना घर गृहस्वामिनीचे नवीन कल्पना राबविणेत यावी. असा निर्ण घेताला. घरांच्या सर्व नोंदी पत्नीच्या नांवे करणार्याव ग्रामपंचायतीस घर गृहस्वामिनीचे पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत मानपत्र व बक्षीस रक्कम रु.१०,०००/- देण्याचा निर्ण घेतला आहे. सन २००३-०४ या आर्थिक वर्षामध्ये कागल तालुक्यातील जैन्याळ ग्रामपंचायतीने घर गृहस्वामिनीचे योजना राबवून पारितोषीक घेण्याचा प्रथम मान प्राप्त केला आहे. सन २०१०-११ पर्यंत या योजनेमधून बक्षीस रक्कम व सन्मानपत्र देवून जिल्हा परिषदेमार्फत पंच्याहत्तर ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले आहे.