यशवंत सरपंच पुरस्कार

जिल्हा परिषद, स्वनिधीतून सन 2004-05 या आर्थिक वर्षापासून यशवंत सरपंच पुरस्कार योजना सुरू केलेली आहे. सदर योजनेमध्ये उत्कृष्ठ ग्रामपंचायत व सरपंच यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागणी केले जातात. प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस रक्कम रूपये 25,000/- व व्दितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस 15,000/- व प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच यांना वैयक्तिक बक्षीस रक्कम रूपये 1,000/- व चांदीचे पदक या स्वरूपात पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. तसेच जिल्हयातील सर्व तालुक्यातून आलेल्या प्रस्तावापैकी अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींची निवड जिल्हा पुरस्कारासाठी निवड करणेत येते. अतिउत्कृष्ट निवड केलेल्या ग्रामपंचायतीपैकी प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस रक्कम रूपये 50,000/- व व्दितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस रक्कम रूपये 30,000/- रोख स्वरूपात पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.