दि. १७ जून २०१९ रोजी प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचेआयोजन

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची १००% पटनोंदणी होणेकरिता जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्येशाळेच्या प्रथमदिवशी ‘शाळा प्रवेशेात्सव कार्यक्रम’ राबविणेत येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळेच्या प्रथम दिनी म्हणजेच १७ जून २०१९ इ. रोजी शाळेमध्ये नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांचे स्वागत करणेत येणार आहे. तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण, शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थाचे वाटप असे उपक्रम राबविणेत येणार आहेत. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी होणेसाठी शाळापूर्व तयारी, शाळांची जाहिरात पत्रके, शाळा व्यवस्थापन समिती नियोजन बैठक, पटनोंदणी प्रभात फेरी अशा उपक्रमांचे आयोजन करणेत येत आहे. १००% पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना प्राथमिक शाळांमध्ये राबविणेत येत आहेत.

शासकीय तसेच स्वनिधीमधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळालोकाभिमुख होणेस मदत झालेली आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देत असून त्याला समाजाचीही साथ मिळण्याची गरज आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रथम दिनानिमित्त पदाधिकारी, अधिकारी यांच्या शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले आहे.

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती-जिल्हा परिषदसदस्य, आमदार, खासदार इ. लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकारी यांनी सक्रीय सहभागी होणेचेतसेच पालकांनी ६ ते १४ वयोगटातील सर्व दाखलपात्र बालकांची पटनोंदणी जिल्हा परिषदेच्या शाळेत करणेचेआवाहनजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमन मित्तल, शिक्षण समिती सभापती श्री.अंबरिषसिंह घाटगे व प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ.आशा उबाळे यांनी केले आहे.

 

 

 

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर