लोक संख्या दिना निमित्त प्रभात फेरीचे आयोजन

लोक संख्या दिना निमित्त प्रभात फेरीचे आयोजन.

11 जुलै 2019 जागतिक लोकसंख्या दिना निमित्त् जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत “प्रभातफेरी” चे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीचे उदघाटन जिल्हा परिषदे चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविकांत अडसूळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. “कुटुंब नियोजन करुन स्विकारा जबाबदारी, आई व बाळाच्या संपूर्ण आरोग्याची ही तयारी“. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री भालेराव, जिल्हा माता बाल संगोपन अधिकरी डॉ. फारुख देसाई, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच मेन राजाराम हायस्कुलचे विदयार्थी, शिक्षकउपस्थित होते. तसेच सी.पी.आर. येथील नर्सिंग कॉलेज मधील विघ्यार्थीनी उपस्थित होत्या. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , शेंडा पार्क येथील प्रक्षिणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले कि, अर्माद लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी, आपु-या आरोग्य सेवा, अन्न् धान्य् तुटवडा, महागाई, स्थलांतर, पर्यावरण समस्या निर्माण झाल्या आहेत. 11 जुलै ते 24 जुलै लोकसंख्या स्थिरता पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या मध्ये तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन, कु.क. शस्त्रक्रिया शिबीर, तांबी बसविणे तसेच तात्पुरत्या व कायमच्या कु.क. नियोजनच्या पध्दती माहिती व जनजागृती या पंधवडयात करण्यात येणार आहे. तसेच “कुटुंब नियोजन करुन स्विकारा जबाबदारी, आई व बाळाच्या संपूर्ण आरोग्याची ही तयारी“” या घोष वाक्याची या वर्षी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. डॉ देसाई उपस्थिताचे आभार मानून प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.
—————————————————————————-