शालेय विद्यार्थ्यांच्या शीघ्र निदानासाठी कार्यशाळेचे आयोजन

सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत दरवर्षी ० ते १८ वयोगटातील बालकांची शालेय आरोग्य तपासणी करणेत येते.    शालेय आरोग्य तपासणीमध्ये शाळास्तरावर उपचार होवू न शकलेल्या बालकांना तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी तसेच त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडे संदर्भिय सेवेसाठी संदर्भित केले जाते. जिल्हा शल्यचिकित्सकांनी शिफारस केलेल्या बालकांवर सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विविध शासकीय तसेच शासन मान्य रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया केली जाते. दिव्यांग बालकांना गरजेनुरुप दृष्टी मूल्यमापन, श्रवण मूल्यमापन, मानसशास्त्रीय मूल्यमापन, साहित्य व साधने, मदतनीस व प्रवासभत्ता, ब्रेलबुक व लार्ज प्रिंटबुक अशा सुविधाही सर्व शिक्षा अभियानामधून पुरविणेत येतात.

सन २०१६-१७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४,६६,५३५ बालकांची मार्च २०१७ अखेर शालेय आरोग्य तपासणीच्या पथकामार्फत आरोग्य तपासणी झालेली आहे. या तपासणीमध्ये जिल्ह्यातील ६७,५२५ विद्यार्थ्यांना किरकोळ शारिरीक व्याधी आढळून आली असून ती प्राथमिक उपचाराने बरी करण्यात यश आलेले आहे.

सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये ० ते १८ या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व आजाराचे निदान लवकरात-लवकर होवून योग्य उपचार वेळीच होणेसाठी जिल्हातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकडील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा दि.१४ जून २०१७ रोजी राजर्षि शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर कार्यशाळेला क्षयरोग तज्ञ डॉ.यु.जी. कुंभार, कुष्टरोग तज्ञ डॉ.शित्तू जमखानी / डॉ.हर्षदा वेदक, हृदयरोग तज्ञ डॉ.अर्जुन आडनाईक, दंतचिकित्सक तज्ञ डॉ.रमेश पोरवाल, नेत्ररोग तज्ञ डॉ.अजेटराव, कान, नाक, घसा तज्ञ डॉ.वाडकर,  बालरोग तज्ञ डॉ.थोरात, राजीव गांधी जीवनदायी योजनाडॉ.सागर पाटील  हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननिय पदाधिकारी उपस्थित राहणार असून सर्व वैद्यकीय अधिकारी, शिक्षण व आरोग्य विभागाकडील सर्व अधिकारी यांचेसह स्थानिक वृत्तपत्रांचे  वार्ताहर यांना उपस्थित राहणेबाबत आवाहन करणेत येत आहे.

 

 

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर

दि. १५ जून २०१७ रोजी प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची अंमलबजावणी

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची १०० % पटनोंदणी होणेकरिता शाळेच्या प्रथमदिवशी ‘शाळा प्रवेशेात्सव कार्यक्रम’ राबविणेत येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळेच्या प्रथम दिनी म्हणजेच १५ जून २०१७ इ. रोजी शाळेमध्ये नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांचे फुल देवून स्वागत करणेत येणार आहे. तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण, शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थाचे वाटप असे उपक्रम राबविणेत येणार आहेत. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करणेसाठी जिल्हा स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांची नियोजन बैठक, गटस्तरावर मुख्याध्यापक कार्यशाळा, शाळापूर्व तयारी, शाळांची जाहिरात पत्रके, शाळा व्यवस्थापन समिती बैठक, पटनोंदणी प्रभात फेरी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रथम दिनानिमित्त पदाधिकारी, अधिकारी यांच्या शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार इ. लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकारी यांनी सक्रीय सहभागी होणेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार, शिक्षण समिती सभापती श्री.अंबरिषसिंह घाटगे व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.सुभाष चौगुले यांनी आवाहन केले आहे.

प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबविणेत येणाऱ्या सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती (ABL), डिजीटल शाळा, ISO शाळा मानांकन अशा उपक्रमांची जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. १००% पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना शाळांमध्ये राबविणेत येत आहेत. शासकीय तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा लोकाभिमुख होणेस मदत झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देत आहेच, त्याला समाजाचीही साथ मिळण्याची अपेक्षा या आवाहनाव्दारे करणेत आलेली आहे.

 

 

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर

*शाळाबाह्य विद्यार्थी विरहीत कोल्हापूर जिल्हा निर्मितीचे नियोजन*

 

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अधिनियमाच्या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील बालकांचे प्राथमिक शिक्षण नजीकच्या नियमित शाळेत होणे आवश्यक आहे. एकही बालक शिक्षणापासून वंचित (शाळाबाह्य) राहू नये याकरिता शिक्षण विभागामार्फत दरवर्षी पटनोंदणी मोहिम, शाळाबाह्य व स्थलांतरीत मुलांचे सर्वेक्षण केले जाते. दाखलपात्र मुलांची १००% पटनोंदणी करण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सातत्याने अग्रेसर राहिलेला आहे. यावर्षी यामध्ये आणखी भर पडणार असून कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत ‘शाळाबाह्य विद्यार्थी विरहीत कोल्हापूर जिल्हा’ करणेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये दि. १५ ऑगस्ट २०१७ पर्यंत शाळाबाह्य विद्यार्थी विरहीत कोल्हापूर जिल्हा निर्मितीकरिता प्राथमिक शिक्षण विभागाने नियेाजन केले असून ते अंमलबजावणीकरिता सर्व तालुक्यांना पाठविणेत आलेले आहेत. या संदर्भाने जिल्हास्तरावर सर्व गटशिक्षणाधिकारी यांची नियोजन बैठक नुकतीच संपन्न झाली असून प्रत्येक गटस्तरावर सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विषयतज्ञ, शिक्षण विस्तार  अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे नियोजन कार्यशाळा घेणेत येणार आहे. या उपक्रमांतर्गत दि.१५ ते ३० जून २०१७ या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व दाखलपात्र बालकांची नियमित शाळेत पटनोंदणी करुन शाळाबाह्य बालकांना वयानुरुप समकक्ष वर्गात दाखल करुन घेणेत येणार आहे. तसेच माहे जुलै २०१७ मध्ये शिक्षण विभागाकडील अधिकारी, शिक्षक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचेसह शाळाबाह्य बालके असण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी व्यापक शोध मोहिम राबवून एकही बालक शाळाबाह्य शिल्लक नसलेची शहानिशा करुन त्यानंतर ‘शाळाबाह्य विद्यार्थी विरहीत कोल्हापूर जिल्हा’ जाहीर करणेत येणार आहे.

 

 

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर

*समावेशित शिक्षण योजना सन 2016-17 (दिव्यांग बालकासाठी)*

 

कोल्हापूरजिल्हापरिषद सर्व शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण योजना (विशेष गरजाधिष्ठित (दिव्यांग) बालकांसाठी) राबविली जात आहे. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ दि. ०१/०४/२०१० पासून अंमलात आला आहे. या अधिनियमातील प्रकरण-२, भाग-३ (२) नुसार नमूद असलेल्या अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अन्वये प्रकरण क्र. ५ मधील कलम २६ अ नुसार राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांना प्रत्येक विशेष गरजा असणाऱ्या बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत सुयोग्य व संचारमुक्त वातावरणात नियमित विद्यार्थ्यासोबत शिक्षणाच्या समान संधी देवून मुख्य प्रवाहात आणणे व त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. विशेष गरजा असणाऱ्या अंशत: अंध, पूर्णत: अंध, कर्णबधिर, मतिमंद, अस्थिव्यंग, वाचादोष, बहुविकलांग, सेरेबल पाल्सी, अध्ययन अक्षमता, स्वमग्न या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार गरज विचारात घेवून त्यांना शिक्षणाच्या नियमित प्रवाहात समावेशित करणेसाठी येणाऱ्या समस्येवर उपाययोजना करुन त्यांना  शैक्षणिक सहाय्यभूत सेवा उपलब्ध करुन देवून शाळेत टिकवून ठेवण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. सदरचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या सूचनेनुसार पुढीलप्रमाणे उपक्रम राबविणेत आलेले आहेत.

औपचारिक कार्यात्मक वैद्यकीय निदान व उपचार शिबिरांचे आयोजन करुन गरजेनुरुप फिजिओथेरेपी, मानसशास्त्रीय शैक्षणिक मूल्यमापन, श्रवण मूल्यमापन, मूल्यमापन शिबिर (मोजमाप), शस्त्रक्रिया पूर्वतपासणी शिबिर यांचे आयोजन करुन शस्त्रक्रिया, साहित्य साधने निश्चिती व समुपदेशन / मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

शस्त्रक्रिया-

अ.                    क्र छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर व ग्रामीण रुग्णालय ठिकाणी झालेल्या शस्त्रक्रिया जे. जे व इतर ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केलेल्या जे. जे व इतर ठिकाणी झालेल्या शस्त्रक्रिया
अस्थिव्यंग नाक, कान, घसा (ENT) नेत्रदोष अस्थिव्यंग नाक, कान, घसा (ENT) नेत्रदोष अस्थिव्यंग नाक, कान, घसा (ENT) नेत्रदोष
९६ १२४ २७ ०७ ०४ ०३ ०१ ०२ ०१


साहित्यसाधने-

                        मोजमाप शिबिरामध्ये ५६५ विद्यार्थ्यांना ७३८ साहित्य साधने निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी १५८ कॅलिपर फिटमेंट करणेत आलेली आहेत. डायसी प्लेअर, ब्रेलकिट, स्मार्ट केन, एम.आर.किट, व्हिलचेअर, रोलेटर, ट्रायसिकल, श्रवणयंत्र, क्रचेस या कार्यालयाकडे प्राप्त झालेले आहेत. सदर साहित्याचे वाटप मोफत करणेत येणार आहेत.

 

ब्रेलबुक व लार्ज प्रिंट –

                        पाठ्यपुस्तकावर आधारित दृष्टिहिन विद्यार्थ्यांनासाठी  ब्रेललिपीतील (ब्रेलबुक) ९४ व अंशत: अंध विद्यार्थ्यांसाठी  ठळक अक्षरातील (लार्ज प्रिंट) २०३पुस्तकांच्या संचाचा पुरवठा करणेत आलेला आहे.

 

मदतनिस भत्ता –

                        अतितीव्र स्वरुपातील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणेकरिता प्रतिमहिना रु.२५०/- या प्रमाणे १० महिन्याचे रक्कम रु. २,५००/- याप्रमाणे १२५० विद्यार्थ्यांना याचा लाभ देणेत आलेला आहे.

 

प्रवासभत्ता

घरापासून शाळेचे अंतर जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना रु.२५०/- या प्रमाणे १० महिन्याचे रक्कम रु. २,५००/- याप्रमाणे १६० विद्यार्थ्यांना याचा लाभ देणेत आलेला आहे.

 

 

पालक प्रशिक्षण –

                        विशेष गरजाधिष्ठित बालकांसाठी सुरु असणाऱ्या सेवासुविधा त्यांच्या अडचणी व पालकांची जबाबदारी याकरिता गटस्तरावर माहे डिसेंबर २०१६ व जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये पालक प्रशिक्षण आयोजित करणेत आले होते.

 

फिजिओ थेरेपीसेवा –

                        विशेष गरजाधिष्ठित सेलेबलपाल्सी, बहुविकलांग, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गातील बालकांना फिजिओथेरेपी देणेत येत आहे.

 

मानसशास्त्रीय शैक्षणिक मूल्यमापन –

                        विशेष गरजाधिष्ठित बालकांना असणाऱ्या समस्यांचे निराकारण करणेकरिता व अध्ययन सुलभ होणेसाठी सदर मुलांचे मानसशास्त्रीय शैक्षणिक मूल्यमापन करणेत येत आहे.

 

 

 

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर

वाळू टंचाई मुळे कोल्हापूर जिल्हा परिषदे मार्फत नवीन इमारत बांधकामासाठी प्रायोगिक तत्वावर कमी वजनाच्या विटांचा (Autoclaved concrete Block Masonary) वापर

 

कोल्हापूर जिल्हा परिषदे मार्फत विविध योजनेतून इमारती बांधकामांची कामे हाती घेतली जातात.  बांधकामासाठी मोठया प्रमाणात वाळूचा वापर होतो. सद्या सर्वत्र वाळू टंचाई असल्याने इमारती बांधकामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.  त्यामुळे कामे रेंगाळत असून जादा दराने वाळू खरेदी करणेत येत आहे.  त्यामुळे नवीन इमारती बांधकामासाठी भाजीव वीट बांधकामा ऐवजी कमी वजनाच्या विटा (Autoclaved concrete Block Masonary) वापरुन बांधकाम केल्यास या बांधकामामध्ये वाळूचा वापर कमी होणार आहे.  वाळू टंचाईमुळे रेंगाळलेली कामे जलद गतीने पूर्ण होणेस मदत होणार आहे.  तसेच, कामावर प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चामध्ये बचत होणार आहे.

सद्य:स्थितीत नवीन मोठया बांधकामाबाबत वरीलप्रमाणे प्रायोगिक तत्वावर कार्यवाही केली जाणार असून, त्याची उपयुक्तता पाहून अन्य इमारत बांधकामामध्ये वरीलप्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे.

 

कार्यकारी अभियंता (बांधकाम),

जिल्हा परिषद, कोल्हापूर

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर

आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया – सन 2017-18

        

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत आली.

सदर प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 321 शाळांमधील RTE अंतर्गत 25 % आरक्षित विद्यार्थी प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण 3269 जागांसाठी दि. 08/02/2017 ते दि. 02/03/2017 या कालावधीत पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविणेत आले. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 1330 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. सदर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरीता दि. 08/03/2017 ते दि. 27/04/2017 या कालावधीत विद्यार्थी प्रवेशाच्या 5 फे-या घेणेत आल्या. यामध्ये एकूण 560 पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित केला व 210 विद्यार्थ्यांचे अर्ज योग्य कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अपात्र ठरविणेत आले.

पालकांच्या आग्रहास्तव दि. 30/04/2017 ते दि. 10/05/2017 या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकारणेची दुसरी फेरी घेऊन नव्याने पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविणेत आले. या कालावधीत एकूण 341 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. सदर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरीता दि. 12/05/2017 ते दि. 02/06/2017 या कालावधीत विद्यार्थी प्रवेशाच्या 2 फे-या घेणेत आल्या. यामध्ये एकूण 170 पालकांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित केला व 98 विद्यार्थ्यांचे अर्ज योग्य कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अपात्र ठरविणेत आले.

अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी एकूण 730 विद्यार्थ्यानी RTE च्या 25 % आरक्षित कोट्याअंतर्गत शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे.

 

 

(श्री. सुभाष रा. चौगुले)

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन

 

दि.5 जून,2017 – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्हयाने हागणदारीमुक्तीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे, जिल्हयाची वाटचाल आता हागणदारीमुक्तीच्या अंतिम टप्प्याकडे सुरू असून  यासाठी जिल्हास्तरावर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ.शौमिका महाडिक,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.सर्जेराव पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.डॉ.कुणाल खेमनार,तसेच शिक्षण सभापती मा.श्री.अंबरिशसिंह घाटगे,तसेच बांधकाम व आरोग्य समिती सभापती मा.श्री.सर्जेराव पाटील-पेरिडकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.इंद्रजित देशमुख व सर्व विभागांचे खातेप्रमुख  उपस्थित होते.

वर्ष 20115-16 मध्ये क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीया मार्फत झालेल्या सर्वेनुसार कोल्हापूर जिल्हा देशात पाचव्या क्रमांकावर होता आता यापुढे देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम तेवढयाचं उत्साहाने करण्याचे आवाहन मा.अध्यक्षा यांनी या कार्यशाळेमध्ये केले तसेच पर्यावरण आणि जलस्त्रोत प्रदुषित होणार नाहीत यासाठी  जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. उपक्रम,योजनांमध्ये उत्कृष्ट लोकसहभाग हे कोल्हापूर जिल्हयाचे वैशिष्टय असून,यापुढे देखील पर्यावरणपुरक आणि स्वच्छतेचे उपक्रम असेच लोकसहभागातून राबविले जातील.यासाठी लोकसहभाग आणि ग्रामीण व शहरी उपाययोजना यांच्यासोबत जिल्हयात घनकचरा -सांडपाणी व्यवस्थापनाचे काम करणेबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले. पाणी व स्वच्छता विभागाच्या मा.श्रीम.सुषमा देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून ग्राम पंचायतस्तरावर आणि घरगुती स्तरावर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थान कसे करता येईल याबाबत माहिती दिली.

या कार्यशाळेच्या सुरूवातीला वर्ष 2016-17 मध्ये पाणी व स्वच्छता विभागामार्फत झालेल्या कामांचा माहितीपट दाखविण्यात आला.तसचे मागील वर्षी पर्यावरणपुरक गणेशोत्सव मध्ये सर्वच तालुक्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतल्या बदद्ल सर्व तालुक्यातील गट विकास अधिका-यांना प्रशस्तिप्रत्र देवून सन्मानित केले.तसेच पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर दि.4 जून,2017 रोजी सर्व ग्राम पंचायतींनी ¯»ÖÖÛÙüú कचरा वेचू,पर्यावरण ¾ÖÖ“Ö¾Öæ  या मोहिमेतर्गंत प्लास्टिक कचरा जमा केला आहे. यातील कार्यशाळेसाठी उपस्थित पंचगंगा नदीकाठच्या गावांना कार्यशाळेस येताना जमा झालेले प्लास्टिक  घेवून येणेबाबत सुचित केले होते त्याप्रमाणे करवीर,शिरोळ व हातकणंगले या तालुक्यातून एकूण 1 ट्रॉली,58 पोती जाम झालेले प्लास्टिक हे कार्यशाळेच्या शुभारंभापूर्वी  अवनी या संस्थेस दिले.

या कार्यशाळेसाठी  सर्व गटविकास अधिकारी,उपअभियंता,(ग्रामीण पाणी पुरवठा विभाग), गट संसाधन केंद्र,पंचगंगा नदी काठच्या गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.दुपारच्या सत्रात मा.श्री.उदय गायकवाड,पर्यावरतज्ञ,किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष श्री.गावडे,अवनि संस्थेच्या उपाध्यक्षा मा.श्रीम.अनुराधा भोसले,घनकचरा सांडपाणाी व्यवस्थापन तज्ञ श्री.सुभाष नियोगी यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे नियोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष,जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले.

जाहिर संक्षिप्त ई-लिलाव सूचना क्र. 03 सन 2017-18(एक वर्षासाठी)

 

जाहिर संक्षिप्त ई-लिलाव सूचना क्र.    03 सन 2017-18(एक वर्षासाठी)

 

जिल्हा परिषद कोल्हापूर येथील मुख्य प्रशासकीय इमारत मधील उपहारगृह  भाडेने  चालविणेत देणे बाबत. (एक वर्षासाठी)

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील मुख्य प्रशासकीय इमारत मधील उपहारगृह भाडेने चालविणेसाठी देणे बाबत कार्यकारी अभियंता (बांधकाम ) जि.प. कोल्हापूर हे पात्र निविदाधारकांकडून लिलाव पध्दतीने दर मागवित आहेत.

कामांची जाहिर ई-लिलाव सूचना क्र.०३/2017-18 “http://.eauction.gov.in” या संकेत स्थळावर दि.  31 /05  /2017 दुपारी 1.00 वाजलेपासून प्रसिध्द करणेत येत आहे.

Sr. No Name of work e-auction Form cost E.M.D.
1 e-auction is  Invited  to run the Canteen in the premises of Main Administrative Building, Z.P. Kolhapur on Rental Basis.

 

1000 5000.00

सदर कामांची विस्तृत जाहिर निविदा सूचना “http://.eauction.gov.in” या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

 

 

कार्यकारी अभियंता ( बांधकाम )               मुख्य लेखा व वित्त अधिकारी              अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद कोल्हापूर                          जिल्हा परिषद कोल्हापूर                        जिल्हा परिषद कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत ” वाचाल तर वाचाल ” या व्याख्यानमालेचे आयोजन

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयाच्यावतीने अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये वाचन संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व्याख्यानमालेचे आयोजन करणेत येत आहे. या उपक्रमांतर्गंत दरमहा अखेर व्याख्यानाचे आयोजन करणेत येते. दि.31/05/2017 इ. रोजी दुपारी 4.00 वा. राजर्षि शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प सुप्रसिद्ध वक्ते व श्वसन विकार तज्ञ डॉ.अनिल मडके यांनी गुंफले. या वेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार,समाजकल्याण सभापती श्री.विशांत महापूरे,प्रकल्प संचालक डॉ.हरिष जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.इंद्रजित देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चंद्रकांत वाघमारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.ए.जी.मगदूम यांचेसह जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.ए.जी.मगदूम यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री.संदिप मगदूम यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करून व्याख्याते डॉ.अनिल मडके यांनी केलेले कार्य सांगितले.

डॉ.अनिल मडके यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील व्याख्यानामध्ये माणसाच्या जीवनातील वाचनाचे महत्व विषद करणेसाठी अनेक उदाहरणे दिली. आयुष्यातील छोटया छोटया गोष्टी निट करण्याचा संस्कार वाचन शिकवते. माणसाच्या जीवनावर ताणतणावाचा विपरीत परिणाम होत असून तो दूर करण्याच्या उपाय वाचन आहे. चांगले पुस्तक हे मधमाश्यांच्या पोळयाप्रमाणे असते,त्यातून गोडवा,जीवन व प्रकाश मिळतो. शरीराला जशी व्यायामाची गरज असते तशी मेंदूला मशागतीची गरज असते,आणि ही मशागत वाचनातून होते. हल्ली माणसाचे बोलणे वाढले आहे परंतु वाचन कमी झाले आहे. जीवन समृध्द करायचे असेल तर वाचन गरजेचे आहे. चांगले पुस्तक हा माणसाचा मित्र आहे. लेखक हा जन्माला यावा लागतो,तो घडविता येत नाही;याउलट वाचक घडावा लागतो. अशा रीतीने डॉ.अनिल मडके यांनी  या आपल्या व्याख्यानाने कर्मचारी व अधिकारी यांना मंत्रमुग्ध केले.

समारोपाच्या मनोगतामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंद्रजित देशमुख यांनी माणसाच्या आयुष्यात वाचन व लेखन यांना अनन्यसाधारण महत्व असलेने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी नियमित वाचन करावे असे आवाहन केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मराठी भाषेचा महिमा सांगताना महाराष्ट्रातील थोर संतांनी समाज प्रबोधनासाठी केलेल्या लेखनाची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा  हागणदारी मुक्त योजनेत राज्यात प्रथम आल्याबद्दल महराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचा सत्कार करणेत आला.  सदर व्याख्यानाच्या आयोजनाकामी सहकार्यबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्रतिनिधींचा सत्कार करणेत आला.

प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.ए.जी.मगदूम यांनी आभार मानले.

 

                                                      शिक्षणाधिकारी (प्राथ.)

                                                      जिल्हा परिषद कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत " वाचाल तर वाचाल " या व्याख्यानमालेचे आयोजन

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयाच्यावतीने अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये वाचन संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व्याख्यानमालेचे आयोजन करणेत येत आहे. या उपक्रमांतर्गंत दरमहा अखेर व्याख्यानाचे आयोजन करणेत येते. दि.31/05/2017 इ. रोजी दुपारी 4.00 वा. राजर्षि शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प सुप्रसिद्ध वक्ते व श्वसन विकार तज्ञ डॉ.अनिल मडके यांनी गुंफले. या वेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार,समाजकल्याण सभापती श्री.विशांत महापूरे,प्रकल्प संचालक डॉ.हरिष जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.इंद्रजित देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चंद्रकांत वाघमारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.ए.जी.मगदूम यांचेसह जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.ए.जी.मगदूम यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री.संदिप मगदूम यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करून व्याख्याते डॉ.अनिल मडके यांनी केलेले कार्य सांगितले.

डॉ.अनिल मडके यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील व्याख्यानामध्ये माणसाच्या जीवनातील वाचनाचे महत्व विषद करणेसाठी अनेक उदाहरणे दिली. आयुष्यातील छोटया छोटया गोष्टी निट करण्याचा संस्कार वाचन शिकवते. माणसाच्या जीवनावर ताणतणावाचा विपरीत परिणाम होत असून तो दूर करण्याच्या उपाय वाचन आहे. चांगले पुस्तक हे मधमाश्यांच्या पोळयाप्रमाणे असते,त्यातून गोडवा,जीवन व प्रकाश मिळतो. शरीराला जशी व्यायामाची गरज असते तशी मेंदूला मशागतीची गरज असते,आणि ही मशागत वाचनातून होते. हल्ली माणसाचे बोलणे वाढले आहे परंतु वाचन कमी झाले आहे. जीवन समृध्द करायचे असेल तर वाचन गरजेचे आहे. चांगले पुस्तक हा माणसाचा मित्र आहे. लेखक हा जन्माला यावा लागतो,तो घडविता येत नाही;याउलट वाचक घडावा लागतो. अशा रीतीने डॉ.अनिल मडके यांनी  या आपल्या व्याख्यानाने कर्मचारी व अधिकारी यांना मंत्रमुग्ध केले.

समारोपाच्या मनोगतामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंद्रजित देशमुख यांनी माणसाच्या आयुष्यात वाचन व लेखन यांना अनन्यसाधारण महत्व असलेने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी नियमित वाचन करावे असे आवाहन केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मराठी भाषेचा महिमा सांगताना महाराष्ट्रातील थोर संतांनी समाज प्रबोधनासाठी केलेल्या लेखनाची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा  हागणदारी मुक्त योजनेत राज्यात प्रथम आल्याबद्दल महराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचा सत्कार करणेत आला.  सदर व्याख्यानाच्या आयोजनाकामी सहकार्यबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्रतिनिधींचा सत्कार करणेत आला.

प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.ए.जी.मगदूम यांनी आभार मानले.

 

                                                      शिक्षणाधिकारी (प्राथ.)

                                                      जिल्हा परिषद कोल्हापूर